नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी देशातील जनतेने एकत्रित येऊन लोकशाहीच्या बचावासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले. “एकत्र होऊ या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवू.” असे ट्विट राहुल गांधींनी केले. त्यांनी स्पीक अप फॉर डेमोक्रेसी हॅशटॅगचा वापर केला. यासह त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
स्पीक अप फॉर डेमॉक्रसीमध्ये राहुल गांधींनी राजस्थानच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केले. पैशाच्या बळामुळे तेथील कॉंग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करत भाजपवर आरोप केला होता.
राहुल गांधींनी लिहिले, ‘देशात संविधान आणि कायद्याचे राज्य आहे. जनतेने दिलेल्या बहुमतावर सरकारे बनवतात व चालतात. राजस्थान सरकार पाडण्याचे भाजपचे षडयंत्र स्पष्ट आहे. राजस्थानातील आठ कोटी जनतेचा हा अपमान आहे. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावे जेणेकरून देशापुढे सत्य येईल.
आइए #SpeakUpForDemocracy में एकजुट होकर लोकतंत्र की रक्षा के लिए आवाज़ उठायें। pic.twitter.com/7v1UiOGGZj
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 26, 2020