कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड गावात जमीन खचल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस पडत होता. या पावसाने ताम्रपर्णी नदीकाठची जमीन खचली असल्याची घटना उघडकीला आली आहे.
सुमारे १५० ते २०० फूट लांब ही नदीकाठची जमीन खचली असून सुमारे आठ फूट खाली सरकल्याच समोर आला आहे. त्यामुळे शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी महापुराच्या संकटातून शेतकरी बाहेर पडतो न पडतो तोच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समोर जमीन खचण्याचे संकट पुढे उभ राहिल आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे