कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम आहे. कुंभी आणि घटप्रभा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
मुसळधार पावसामुळे राधानगरी, वारणा, घटप्रभासह 7 प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर राधानगरी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून गेल्या 48 तासांत 1100 क्यूसेकवरून 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पंचगंगा, भोगावती, वारणा, घटप्रभा, हिरण्यकेशी, वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 8 इंचावर पोहचली असून राजाराम, इचलकरंजी, शिंगणापूरसह 24 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.