वेधशाळेने वर्तवला अंदाज
मुंबई : मुंबई आणि ठाणेसह उपनगरांमध्ये रविवारच्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अजुनही ठाणे, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर भागात पाऊस पडतोच आहे. भारतीय वेधशाळेनेही पुढचे काही तास मुंबई आणि नजिकच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु राहिल अशी शक्यता वर्तवली आहे.
India Meteorological Department (IMD) Mumbai: Rainfall to continue with gusty winds. High tide of 4.5 m plus today afternoon, and surcharged Mithi River.
Avoid outing as far as possible, the sea will be rough, fisherman warnings, heavy rainfall warnings have been issued in place.— ANI (@ANI) August 4, 2019
आज दुपारी मुंबईच्या समुद्रात 4.5 मी. उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला मुंबई पोलिस आणि प्रशासनाने दिला आहे. समुद्र खवळलेल्या परिस्थितीत असल्यामुळे मच्छीमार बांधवांनाही आपल्या होड्या समुद्रात न उतरवण्याची विनंती केली आहे. याचसोबत मुंबईत वाकोला, अंधेरी, मिलन सब-वे, सायन-कुर्ला या भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईसोबतच ठाणे-रायगड आणि कोकण किनारपट्टीलाही पावसाचा फटका बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे.