नवी दिल्ली : मागील तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये पावसाने चांगलाच धुडगुस घातला आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर या मुसळधार पावसाने आतापर्यंत 55 लोक ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या चोवीस तासांत अवध प्रदेशात 15,, प्रयागराजमध्ये 14, पूर्वांचलमध्ये 17 बुंदेलखंडमधील सात, सहारनपूर आणि कानपूरमधील एक जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे संततधार पाऊस पाहता लखनऊ जिल्हा प्रशासनाने आजही सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. अवध प्रदेशात पावसामुळे सर्वात जास्त नुकसान अमेठी जिल्ह्यात झाले. इथे सात जणांच्या भिंती पडल्याने मृत्यू झाला. बाराबंकी येथे तीन, आंबेडकरनगरमध्ये दोन आणि सीतापूर, अयोध्या आणि रायबरेली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. रुडौली, मिल्कीपूर, अमानीगंज, पतरंगा या ठिकाणी भिंती व घरे कोसळल्यामुळे लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.