पुणे : विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी घुसले आहे. सुमारे 40 घरात हे पाणी घुसले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्री झालेल्या पावसाने हा प्रकार घडला आहे. रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सध्या मदतीसाठी अग्निशामनदल पोहचले आहे.
रात्री पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आहे आहे. अंगणवाडी, समाजमंदिर, महापालिका येथे त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. आपत्ती विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने मदत पोहचण्यास वेळ लागत आहे. आम्ही नगरसेवक सकाळी सहा वाजेपासून येथे आहोत.
उपमहापौर सिद्धार्थ धेंडे