पिंपरी – मावळातील कासारसाई धरण परिसरात सतत पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. धरण शंभर टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्गही वाढविण्यात येत आहे.
आज ( शुक्रवार, दि. 16 रोजी) दुपारी 2.00 वाजता कासारसाई मध्यम प्रकल्पातून कासारसाई नदी पात्रातून होत असलेला 900 क्युसेक एवढा विसर्ग वाढवून 1350 क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे.
🛑 *महत्वाची सूचना* 🛑
#कासारसाई मध्यम प्रकल्पातून कासारसाई नदी पात्रातून होत असलेला विसर्ग वाढवून १३५० क्युसेक एवढा करण्यात येत आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.-धरण व्यवस्थापन— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) September 16, 2022
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे किंवा कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती प्रशासनाने दिली असून नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन देखील केले आहे.