मुंबई – मागील काही दिवसांत पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागात विश्रांती घेतली होती. मात्र काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. आता पुन्हा पावसाचं आगमन होण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.
पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
Severe weather warnings issued by IMD for 27-31 Aug for Maharashtra.For details pl visit @RMC_Mumbai & @RMC_Nagpur website
Day 1 -4 most of warnings r for Eastern Mah, both TS & Heavy RF.For Day 5 the warnings also included for parts of Konkan &Madhya Mah for isol heavy rainfall pic.twitter.com/EGWyxCcIbj— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 27, 2021
मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत. आज बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.