मुंबई- 1जुन पासून देशांतर्गत रेल्वे सेवा सुरु होणार आहे. त्यात प्रवास करण्यासाठी सरकाने काही नवे नियम जारी केले आहे. त्या सगळ्या नियमांचं पालक करुन रेल्वे प्रवास शक्य होणार आहे. अऩेक ठिकाणी लाॅकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. त्यातच रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे तिकीट बूक करण्यासाठी काय आहेत नियम?
-१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये एकही विनारक्षित जागा नसेल. म्हणजेच जनरल डब्यासाठीही आरक्षित तिकीट काढावं लागेल.
-या ट्रेनमध्ये एसी, नॉन एसी आणि जनरल डबे असतील. एसी आणि नॉन एसीचे दर हे नेहमीप्रमाणेच असतील.
-रेल्वेचं तिकीट हे फक्त आणि फक्त आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर काढता येईल.
-कोणत्याही एजंटला तिकीट काढण्याचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे तिकीट असल्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार नाही. एआरपी कालावधी हा किमान ३० दिवसांचा असेल.
-आरएसी आणि प्रतिक्षा यादी नियमाप्रमाणेच जाहीर केली जाईल. प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही.
-प्रवाशांना विनारक्षित तिकीट दिलं जाणार नाही, शिवाय अशा प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेशही मिळणार नाही. या ट्रेनमध्ये तत्काळ आणि प्रीमिअम बुकिंग सुविधा नसेल.
पहिला चार्ट प्रस्थानापूर्वी ४ तास आणि दुसरा चार्ट प्रस्थानापूर्वी २ तास जारी केली जाईल. सध्या हा चार्ट ३० मिनिटे अगोदर जारी केला जातो.
पहिला आणि दुसरा चार्ट करताना फक्त ऑनलाइन बुकिंग विचारात घेतली जाईल.
सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल आणि ज्या प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणे नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल.