पिंपरी -युवा आविष्कार प्रतिष्ठान- आई तुळजभवानी मंदिर ट्रस्ट व शिवनगरी बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने बिजलीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहोत्साची “रायबा… हेच का स्वराज्य?’ या महानाट्याने सांगता झाली. हे नाटक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमासाठी नगरसेवक राहुल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवरायांचे विचार आणि आचार घराघरांत रुजविण्यासाठी परिसरातील तरुणांच्या वतीने एकत्रितपणे हा शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “रायबा….हेच का स्वराज्य?’ ह्या महानाट्याने शिवमहोत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील आणि प्रदीप माने यांनी मार्गदर्शन केले.
शिवमहोत्सव यशस्वीपणे पार पाडण्याकरिता आशुतोष कातवरे, हृषीकेश उत्तेकर, अक्षय होले, शुभम जाधव, अजय नरबाडे, कल्पेश चौधरी, संकेत शेळके, अमोल सोनवणे, समीर दातार, रवी हेळवर, उमेश अहिरराव, लक्ष्मण रेड्डी, विजय जाधव, रोशन राणे, विनायक रेडकर, आकाश राठोड, उत्तम वाघमारे, चिदानंद कांबळे, अभिजित भालेराव, आत्मज घोडगे, नीलेश चौगुले, दत्ता होले, जीवन ढवण, अजय नवगिरे यांनी परिश्रम घेतले.