नगर – मी महाराष्ट्राचा मंत्री झालो असलो तरी माझ्या मतदार संघातील लोकांसाठी काम करण्याला प्राधान्य देणार आहे. राहुरी मतदार संघात गेल्या पंधरा वर्षात काहीही कामे झाली नाहीत. यामतदार संघातील प्रमुख प्रश्न सोडवताना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच माझी भूमिका असेल असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यांनी सांगितले. जिल्हा विभाजन झाले पाहिजे असे माझे मत आहे. त्यासाठी पाठपुरावाही करणार आहे असे ते म्हणाले.
मंत्री झाल्यानंतर तनपुरे पहिल्यांदाच नगरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकारने किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार काम करणार आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षात राहुरी मतदार संघात कामे झाली नाहीत. रोजगार, पायाभूत सुविधा, धरणग्रस्ताचे प्रश्न, औद्योगीक वसाहत, वाबोरी चारी हे प्रश्न कायम दुर्लक्षित ठेवले गेले. एक प्रकारे मतदार संघातील लोकांवर पंधरा वर्ष विकासाबाबत अन्यायच झाला आहे.
आता या भागातील प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यावर भर देणार आहे. शेतकऱ्यांना सर्व बाबतीत न्याय मिळावी अशीच भूमिका ठेवून मी काम करणार आहे. त्यात कोणी राजकारणही आणू नये. राहुरी तनपुरे साखर कारखाना चालावा ही आमची भूमिका आहे. जिल्हा बॅंकेच्या काही धोरणामुळे अडचणी आल्या. लष्करी कामासाठी नगर, राहुरी पारनेर तालुक्यातील जमीनी हस्तारीत करण्याबाबत सातत्याने चर्चा होत आहे.
पक्ष वाढीसाठी एकदिलाने काम करणार
नगर जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा आहे. त्यामुळे जिल्हा विभाजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपन पाठपुरावा करणार आहोत. महसुल विभाग बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार असल्याने जिल्हा विभाजन करण्याला अधिक गतीने होणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये मंत्रीपदाबाबत कोणीही नाराज नाही. आम्ही राष्ट्रवादीचे सहाही आमदार एकदिलाने पक्ष वाढीसाठी काम करणार आहोत.