नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) विरोधात झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या दोन जणांच्या कुटुंबियांची प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील बिज्नोर येथे जाऊन भेट घेतली. मिरत येथे हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी सोमवारी मिरतला प्रियांका, राहूल आणि सोनिया गांधी रवाना झाल्या.
का कायद्या विरोधातील उफाळलेल्या हिंसाचारात उत्तर प्रदेशात 17 जण मरण पावले. शुक्रवारी उफाळलेल्या हिंसाचारात मिरतमध्ये आणखी एक जण मरण पावला. त्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचे पोलिस महानिरीक्षक ओमसिंह यांनी सांगितले. राज्यात 35 पोलिस जखमी झाले आहेत. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हिंसाचारात 102 जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंटरनेट सेवा अद्याप खंडित असून समाज माध्यामांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.का कायदा हा देशाच्या धर्मनिरपेक्ष धोरणांच्या विरोधात आहे, असा का कायद्याच्या विरोधकांचा आक्षेप आहे.