राहुल गांधी यांची मोदी सरकारला सुचना
नवी दिल्ली – देशाच्या खराब अर्थव्यवस्थेवर नेमकी काय उपाययोजना करावी याविषयी सरकार पुर्ण दिशाहीन झाले आहे. त्यांना यातून कसा मार्ग काढायचा हे सुचत नसेल तर त्यांनी आमच्या निवडणूक जाहीरनाम्यातील कल्पना चोराव्यात आणि अर्थव्यवस्थेवर उपाययोजना करावी अशी सुचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खूप मंदावली असून ती सात वर्षाच्या नीचांकी पातळीवर केली आहे असे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी ट्विटरवर हीं टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ग्रामीण भारत अत्यंत हालाकीच्या स्थितीत आहे. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस आकुंचन पावत आहे आणि सरकार पुर्ण दिशाहींन बनले आहे. त्यांना मार्ग सुचेनासा झाला आहे.
हे बिघडलेले अर्थकारण कसे सुधारायचे याच्या काही कल्पना आम्हीं आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात मांडल्या आहेत. सरकारने या कल्पनांची चोरी करावी आणि त्या आधारे देशाची अर्थव्यवस्था सुधारावी अशी सुचनाहीं राहुल गांधी यांनी केली आहे.