नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे केंद्र सरकारची वाटाघाटींची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली असून मोठा जमाव दिल्ली-नोएडा सीमेवर दाखल झाल्याने दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे.
शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली; दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा मार्ग बंद
याच मुद्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय आहे राहुल गांधी यांचे ट्विट
कहा- किसान की आय दुगनी होगी।
किया- ‘मित्रों’ की आय हुई चौगुनी और किसान की होगी आधी।
झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार। pic.twitter.com/anSiQ8Zird
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 2, 2020
“शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.