नीमच (मध्यप्रदेश) – बालाकोट हल्ल्याच्यावेळी ढगाळ वातावरण असल्याचा आपण लाभ उठवला पाहिजे त्यामुळे आपली विमाने रडावर दिसणार नाहींत असा सल्ला मी लष्करी अधिकाऱ्यांना दिला होता असे जे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले आहे त्याची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज येथील प्रचार सभेत जोरदार खिल्ली उडवली. मोदींना उेद्दशून त्यांनी असा सवाल केला की जेव्हा भारतात ढग असतात किंवा पाऊस असतो त्यावेळी सगळीच विमाने रडावरून गायब होत असतात काय? मोदींनी अभिनेता अक्षयकुमार यांना दिलेल्या मुलाखतीत आंबा कसा खातो आणि तो आपल्याला किती आवडतो यावरही मोदींनी भाष्य केले आहे.
त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी म्हटले आहे की आंबा कसा खातात हे तुम्ही आम्हाला त्या मुलाखतीत सांगितले. आता बेरोजगार युवकांसाठी तुम्ही काय केले हेही देशाला सांगा अशी सुचना त्यांनी मोदींना केली आहे. मोदींच्या राजवटीत लागू करण्यात आलेला विचीत्र जीएसटी आणि नोटबंदी यामुळे देशाची अर्थव्यवस्था पार बिघडली असून या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला ताळ्यावर आणण्याचे काम कॉंग्रेसची न्याय योंजना करेल असा विश्वासहीं त्यांनी या सभेत बोलताना व्यक्त केला. न्याय व्यवस्थेमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येईल असे ते म्हणाले.