नवी दिल्ली – करोनाच्या बाबतीत सरकार फाजिल आत्मविश्वासात आहे. याच फाजिल आत्मविश्वासातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा सुरू आहे. करोना अजून संपलेला नाही ही बाब त्यांनी दुर्लक्षित करता कामा नये असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
करोनाचे नवीन विषाणू भारतात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. दक्षिण अफ्रिका अिाण ब्राझील येथून या नवीन विषाणुंचा प्रादुर्भाव उत्तन्न होत आहे. भारतात ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेतील या विषाणुंची लागण झालेले काही रूग्ण आढळून आले असल्याची बाब आरोग्यमंत्र्यांनीच निदर्शनाला आणून दिली आहे.
त्या अनुषंगाने भारत सरकार गांभीर्याने काही उपाययोजना करीत नसल्याचे राहुल गांधी यांनी या ट्विटर संदेशाद्वारे सूचित केले आहे. दरम्यान भारतात गेल्या 24 तासात कोविडचे 11 हजार 610 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
GOI is being grossly negligent and over confident about Covid-19.
It’s not over yet. pic.twitter.com/W3FcSkS2JD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 17, 2021