मुंबई – आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस देखील चांगलाच वादळी ठरला. राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याचे पडसाद आज सभागृहाबार देखील पाहायला मिळाले. राहुल गांधींनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. माफी मागायला मी सावरकर नाही गांधी आहे असं विधान नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींच्या हा विधानाचा चांगलाच समाचार घेतला. सावकरांना तुम्ही काय समजता ? असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
आजही राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला आहे. सावरकर हे महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. सावरकरांनी काळा पाण्याच्या यातना भोगल्यात त्या परिस्थितीत देशासाठी त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या. राहुल गांधींनी एक दिवस त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं. तेव्हा त्यांना कळेल त्यांच्या वेदना काय होत्या असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी नेमकं
या लोकांनी मला सर्वात मोठी भेट दिली आहे. माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत. मला अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी लोकशाही संपल्याचे संकेत दिले आहेत” अस राहुल गांधी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले यावेळी म्हणाले.