जालना- राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही कदाचित त्यांचा तोल गेला असावा, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली होती, असं समोर आलं होतं.
या धक्काबुक्कीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. युपी सरकारवर अनेकांनी निशाणा साधला. या घटनेसंदर्भात अनेक मोठ्या नेत्यांनी संताप व्यक्त केला.
एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झालं असावं, असंही ते म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंत देशभरातील अनेक पक्षांनी, नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्याचे पडसात महाराष्ट्रातसुद्धा उमटताना बघायला मिळालं. या प्रकरणाबाबत नेमके काय निर्णय घेतले जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.