नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही पदयात्रा महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटापर्यंत नेण्यात आली होती.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काढण्यात् आलेली “गांधी संदेश यात्रा’ दीनदयाल उपाध्याय मार्गावरील राजीव भवन या दिल्ली कॉंग्रेस कार्यालयापासून निघाली आणि सुमारे तीन किलोमीटर दूर राजघाटापर्यंत नेली.
यावेळी कॉंग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून ‘महात्मा गांधी अमर रहे’ अशी घोषणाबाजी केली. तर अनेक तरुण गांधींजींसारखा चष्मा आणि धोतर घालून आणि हातात लाठी घेऊन मोर्चात चालले.
गांधींच्या साबरमती आश्रमाची प्रतिकृती आणि त्यांचा लाकडी चरखाही या मोर्चामध्ये सहभागी केला गेला होता.
राजघाट येथे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते कामगार आणि नेत्यांना शपथ देऊन मोर्चाचा समारोप झाला. महात्मा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनीही लखनौमध्ये मोर्चात भाग घेतला.