Rahul Gandhi on Mohan Bhagwat । अयोध्या राम मंदिरात राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली त्यादिवशी भारताला “खरे स्वातंत्र्य” मिळाले असे धक्कादायक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी काल केले होते. आता त्यांच्या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हा लढवय्यांचा, प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान Rahul Gandhi on Mohan Bhagwat ।
नवी दिल्लीतील काँग्रेसच्या नवीन मुख्यालय ‘इंदिरा भवन’चे उद्घाटन केल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी मोहन भागवत यांच्या विधानाचा समाचार घेतला. राहुल गांधींनी मोहन भागवत यांच्या या विधानाला ‘देशद्रोह’ म्हटले. तसेच “१९४७ मध्ये भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले नाही ही मोहन भागवत यांची धाडसी टिप्पणी ही आपल्या स्वातंत्र्यलढ्यावर हल्ला आहे.” हा लढवय्यांचा, प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान आहे आणि आपल्या संविधानावर हल्ला आहे.” अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांनी आरएसएस प्रमुखांवर हल्लाबोल करत,’मोहन भागवत दर दोन-तीन दिवसांनी त्यांच्या विधानांद्वारे देशाला स्वातंत्र्य चळवळ आणि संविधानाबद्दल त्यांचे मत सांगत असतात. त्यांनी अलिकडेच जे म्हटले ते देशद्रोह आहे, कारण त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की संविधानाला कोणतेही महत्व नाही नाही, ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याला कोणतेही महत्त्व नाही. मोहन भागवत म्हणाले होते की अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकाची तारीख ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी करावी, कारण अनेक शतकांपासून शत्रूंच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशाला या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले.
हे मूर्खपणाचे बोलणे ऐकणे थांबवण्याची वेळ आली Rahul Gandhi on Mohan Bhagwat ।
काँग्रेस खासदार म्हणाले, ‘मोहन भागवत यांच्यात भारतात सार्वजनिकरित्या हे बोलण्याचे धाडस आहे. जर त्यांनी हे इतर कोणत्याही देशात सांगितले असते तर त्याला अटक करून खटला चालवला असता. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. हे मूर्खपणाचे बोलणे ऐकणे थांबवण्याची वेळ आली आहे कारण या लोकांना वाटते की ते फक्त पुनरावृत्ती करत आणि ओरडत राहू शकतात.’
ते पुढे म्हणाले,’आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत असे समजू नका. यामध्ये कोणतीही निष्पक्षता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण भाजप किंवा आरएसएस नावाच्या राजकीय संघटनेशी लढत आहोत, तर तुम्हाला काय चालले आहे ते समजत नाही. हा दोन विचारांमधील संघर्ष आहे. एका बाजूला आपला विचार आहे जो संविधानाचा विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसचा विचार आहे जो त्याच्या विरुद्ध आहे. देशात दुसरा कोणताही पक्ष भाजप आणि आरएसएसचा अजेंडा थांबवू शकत नाही. फक्त काँग्रेसच त्यांना रोखू शकते. कारण आपण एक विचारसरणी असलेला पक्ष आहोत.
राहुल गांधी म्हणाले की, ‘आज सर्व तपास यंत्रणांना फक्त एकच काम देण्यात आले आहे – विरोधी नेत्यांना टार्गेट करणे आणि त्यांना तुरुंगात पाठवणे. ते म्हणाले की, ‘आज निवडणूक आयोगालाही स्वतःला स्वच्छ करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीचा डेटा द्यावा. पण त्यांच्याकडून हे नाकारले जात आहे. अशा परिस्थितीत, निवडणूक व्यवस्था योग्य आहे यावर आपण कसा विश्वास ठेवू शकतो? निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत आहेत हे सिद्ध करणे निवडणूक आयोगाचे काम आहे, परंतु ते केले जात नाही.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा
“माणसं मारायला लागला तर मग त्याचं समर्थन करायचं का?” ; कराडविषयीच्या ‘त्या’ दाव्यावर सुरेश धस कडाडले