नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घाट आहेत. तर दुसरीकडे काही जणांनी भाजपा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, राजस्थानमधील सत्तानाट्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानमधील ही परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली असून गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल,अशी प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH: "The whole crisis (in Rajasthan) is due to Rahul Gandhi and his family because they insult young leaders and are jealous of them… Gandhis only want those do "he he he" with them to stay in government," says BJP leader Uma Bharti pic.twitter.com/zqFpkkbEOc
— ANI (@ANI) July 14, 2020
“सध्या निर्माण झालेले संकट हे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळेच निर्माण झालेले आहे. ते तरूणांना अपमानित करतात. ते स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत. त्यांच्या पाठीपाठी करणाऱ्यांनाच सरकारमध्ये राहावेत अशी त्यांची इच्छा असते,” असे उमा भारती म्हणाल्या. “तरूण आणि बुद्धीवान नेत्यांना त्यांनी एवढा अपमान केला की तो त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या समोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सचिन पायलट हे राजेश पायलत यांचे सुपुत्र आहेत. राजेश पायलट हे माझ्या भावासारखे होते. आमचे कौटुंबीक संबंध आहेत आणि सचिन पायलट हे स्वाभिमानी व्यक्ती आहेत हे मला माहित आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकं जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल,” असेही त्यांनी म्हटले.
मध्यप्रदेशातील सत्ता गेल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनत होते. या घडामोडीत नोटीस आल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत गेले होते. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांच्या कार्यालये व निवासस्थानावर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्याला एक वेगळंच वळणं मिळालं होतं. दरम्यान, राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय नाट्याला उमा भारती यांनी राहुल गांधी यांनाच जबाबदार धरले आहे.