नवी दिल्ली – देशव्यापी लॉक डाऊनवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज चांगलाच निशाणा साधला. “राहुल गांधी यांचं तर काँग्रेस शासित राज्यांमधील मुख्यमंत्री देखील ऐकत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की एकतर त्यांच्या वक्तव्यांमध्ये वजन नाही अथवा त्यांना त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्रीही गांभीर्याने घेत नाहीत.” अशा शदांमध्ये प्रसाद यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रसाद यांनी, “महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला. पंजाबने तर सर्वप्रथम कर्फ्यू लागू करत लॉक डाऊन जाहीर केले.” असा दाखला देत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनीच गांभीर्याने घेत नसल्याचा दावा केला. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींचं कोणीच का ऐकत नाही? असा प्रश्नही उपस्थिती केला.
“सद्य परिस्थितीत आपण एकत्रित आहोत हे दाखवण्याची आहे. राजकारण हे नंतरही केलं जाऊ शकतं. राहुल गांधी लॉकडाउनचा विरोध केला. तसंच डॉक्टर्स, करोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यासाठी थाळी आणि टाळ्या वाजवण्याचाही विरोध केला. देशात अनेकांनी दिवे लावण्याचा संकल्पही केला होता, त्यालाही त्यांनी विरोध केला,” असंही प्रसाद म्हणाले.