नवी दिल्ली – राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु झालेली भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यात आहे. जम्मू काश्मीरमध्ये यात्रा दाखल होताच राहुल गांधींनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पोहचताच आनंद होत असल्याच्या भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी राहुल गांधींनी एक ट्विट देखील केले आहे. ज्यात त्यांनी आपण घरी जात असल्याचे म्हंटले आहे.
“आज, जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचताना खूप आनंद होत आहे कारण मी माझ्या घरी जात आहे, जिथे माझ्या पूर्वजांची मुळे आहेत. मी शिकत समजून घेत चाललो आहे, स्वतःला,प्रत्येक प्रदेशाला माझ्या देशाला” अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. राहुल गांधींच्या या यात्रेला विविध ठिकाणच्या अनेक सर्वसामान्य नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
आज, जम्मू-कश्मीर पहुंचने की बहुत खुशी है, क्योंकि अपने घर जा रहा हूं, जहां से मेरे पूर्वजों की जड़ें जुड़ी हैं।
और, सीखता समझता जा रहा हूं, खुद को, हर प्रदेश को, अपने देश को। pic.twitter.com/Q0RJaw005r
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 19, 2023
लखनपूर येथे झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “मला माहित आहे की जम्मू-काश्मीरच्या जनतेला किती त्रास सहन करावा लागला आहे. मला समजले की प्रत्येकजण दुखावला आहे.” तसेच यावेळी सभेत राहुल गांधींनी काही ठराविक उद्योगपतींच्या घशात देशाची संपत्ती जात असल्याचे देखील म्हंटले. त्यासोबतच शेतकऱ्यासांठी आणलेल्या तीन काळ्या कायद्यांचा उल्लेख करत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली.