नवी दिल्ली – कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळवरून अद्यापही सुरूच असून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून या विधेयकांचा जोरदार विरोध केला जात आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.
२०१४ मधील निवडणुक कालावधीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत राहुल गांधी म्हणाले कि, २०१४- मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP
२०१५- मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होणार नाही.
२०२० – काळा शेतकरी कायदा
मोदीजींचा हेतू ‘स्वच्छ’ कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना समुळ नष्ट, श्रीमंत मित्रांचा मोठा विकास, अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केले आहे.
2014- मोदी जी का चुनावी वादा किसानों को स्वामीनाथन कमिशन वाला MSP
2015- मोदी सरकार ने कोर्ट में कहा कि उनसे ये न हो पाएगा
2020- काले किसान क़ानून
मोदी जी की नीयत ‘साफ़’
कृषि-विरोधी नया प्रयास
किसानों को करके जड़ से साफ़
पूँजीपति ‘मित्रों’ का ख़ूब विकास।— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 22, 2020
दरम्यान, कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.