Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेली भारत जोडो यात्रा कन्याकुमारीवरून सुरु झाली असून सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या टीकांमुळे राज्यातील राजकारण चांगलाच तापलं आहे. राहुल गांधींच्या वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील भाजपा, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाल्याचे दिसले. मात्र यासगळ्यांमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा झाली आहे. दरम्यान, वाशिममधील शेगाव येथे आयोजित सभेत राहुल गांधींनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याबाबत राज्यासह केंद्र सरकारलाही जाब विचारला.
Bharat Jodo Yatra । “भाजपाने देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली” राहुल गांधींची टीका
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधांनाही जर शेतकऱ्यांची व्यथा ऐकली त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर एकही शेतकरी आत्महत्त्या करणार नाही. त्यांनी प्रेमाने शेतकऱ्यांची मागणी ऐकली तर त्यांनाही शेतकऱ्यांची व्यथा समजेल. शेतकरी सांगतात, आम्ही विम्याचे पैशे भरले, आपत्ती आली मात्र शेतकऱ्याला काहीही मदत मिळाली नाही. शेतकरी प्रश्न विचारतात, राहुलजी शेतकरी आत्महत्त्या का करतो? त्याच्यावर ५० हजार- १ लाख रुपयांचं कर्ज असते, म्हणून शेतकरी आत्महत्त्या करतो. राहुलजी शेतकऱ्यांचं एव्हढा कर्ज माफ होत नाही, मग या हिंदुस्थानात अरबपती आणि करोडपतींचे कर्ज कसे माफ होतात? हि भीती शेतकऱ्याच्या मनात या भाजपाने निर्माण केली आहे.”
Bharat Jodo Yatra । “भाजपाने देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली” राहुल गांधींची टीका
“या यात्रेत फक्त शेतकरी नाही तर युवाही आपली व्यथा मांडत आहेत. हजारो युवायकांशी मी संवाद साधला, कुणाला डॉक्टर तर कुणाला वकील तर कुणाला आर्मीमध्ये जायचंय. आईवडील लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना शिकवतात. मात्र या युवकांना आज बेरोजगार म्हणून राहावं लागत आहे. शिकलेले युवक आज उबरमध्ये गाड्या चालवत आहेत. दोन तीन ठराविक उद्योगपती देशाला लुटण्याच काम करत आहेत. ते आपण सर्वांनी मिळून थांबवायचं आहे.”
LIVE: Public Meeting | Shegaon, Maharashtra | Bharat Jodo Yatra https://t.co/gcFHpeyCwF
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 18, 2022