नवी दिल्ली – देशातील करोना रुग्ण संख्या 1 कोटींच्या घरात पोहोचल्याच्या वृत्तावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, करोना विरोधातील लढाई आपण 21 दिवसांत जिंकू, असा दावा मोदींनी केला होता व त्यासाठी त्यांनी अनियोजितपणे देशात अचानक लॉकडाऊनही जाहीर केले होते. पण त्यांचा हा दावा तर फेल गेलाच पण अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील लक्षावधी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
मोदींनी मार्च महिन्यात बोलताना असा दावा केला होता की, महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले होते. आता करोनाच्या विरोधातील युद्ध आपण 21 दिवसांत जिंकू. त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदींचा दावा खरा ठरला नाही.
आज देशातील करोना बाधितांची संख्या 1 कोटी पार करून गेली आहे. दीड लाख लोकांना आपला यात प्राण गमवावा लागला आहे. त्यांच्या अनियोजित लॉकडाऊनमुळे लक्षावधी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.