नवी दिल्ली : सरकारच्या द्वेषाशी केलेल्या संघर्षाचे भीमा कोरेगाव हे प्रतिक आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केले.
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहूल यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली. जे कोणी सरकारला विरोध करते त्यांनी शहरी नक्षली म्हणून संबोधण्यात येते, असे त्यांनी म्हटले आहे.
जे मोदी शहा यांच्या द्वेषाच्या धोरणांना विरोध करतात ते शहरी नक्षलवादी. भीमा कोरेगाव हा सरकारशी केलेल्या संघर्षाचे प्रतिक आहे. ते एनआयए कधीही पुसू शकणार नाही, असे त्यांनी ट्विट केले आहे.