नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आला आहे. केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार असलेल्या राहुल यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर करत भारतात कोणाचे अच्छे दिन आले आहेत, असा सवालही केला आहे.
गलवान भागात भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. अत्यंत कडाक्याच्या थंडीत आणि प्रतिकूल स्थितीत आपले जवान तेथे तैनात आहेत. एका साध्या तंबूत राहून ते देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत. इकडे पंतप्रधान मात्र 8400 कोटींच्या विशेष विमानात बसून फिरत आहेत. ते चीनचे नाव घ्यायलाही घाबरतात अशी तोफ त्यांनी डागली आहे. यावरून कोणाचे अच्छे दिन आले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
देश के जवान भयंकर सर्दी में साधारण टेंट में गुज़ारा करते हुए भी चीन के आक्रमण का डटकर मुक़ाबला करते हैं।
जबकि देश के PM 8400 करोड़ के हवाई जहाज़ में घूमते हैं और चीन का नाम तक लेने से डरते हैं।
किसे मिले अच्छे दिन? pic.twitter.com/mTn6wLafjm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 30, 2020
भारताने अमेरिकेकडून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी विशेष विमाने विकत घेतली आहेत. त्यातील एक विमान काही दिवसांपूर्वीच भारतात दाखल झाले असून अजुन एक विमान लवकरच येणार आहे.
या विमानात सगळ्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी तब्बल 8400 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. त्या अनुशंगाने राहुल सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.