मुंबई – भारताच्या लक्षणीयरित्या भर घालणाऱ्या राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज हरियाणाच्या अंबाला हवाई तळावर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलमुळे नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार म्हणाले कि, आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर गंभीरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही.
तसेच जर भारताने सुरक्षेच्या दृष्टीने १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्याने चीनला त्याची काळजी वाटेल असे मला वाटत नाही. भारताने राफेल हवाई दलात सामावून घेतलं आहे हे चांगले आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असे वाटत नाही, असेही त्यांनी संगितले आहे.