पुणे – भारत केंद्रीत शिक्षण व्हावे यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विकासाच्या दृष्टीने शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांनी टास्क फोर्स तयार करून सक्षमपणे त्याची अंमलबजावणी करण्यात गरज आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी व्यक्त केले.
धोरण तयार करताना सर्व स्तरातून आलेल्या सूचनांचा विचार झाला आहे. आवश्यक त्या सूचना मसुदा तयार झाल्यानंतरही समाविष्ट केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आवड असलेले शिक्षण घेण्याची मुभा मिळणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना इतर आवश्यक प्रशिक्षणही मिळणार आहे.
मातृभाषा व स्थानिक भाषा या जीवंत राहिल्या पाहिजेत. हा भाषाच देशाची ताकद आहेत. संस्कृती, भाषा, शिक्षण यांना महत्त्वच दिलेच पाहिजे, असे डॉ.पोखरियाल यांनी स्पष्ट केले.
जीवनमूल्यांचे शिक्षण आज महत्त्वाचे आहे. शोध, संशोधनाच्या संस्कृतीचा विकास केल्यासच देश सशक्त बनणार आहे, असेही त्यांनी सांगितले.