स्मशानभूमीत काम करणाऱ्या राधाबाईचा कोल्हेंनी केला सन्मान
कोपरगाव : (शंकर दुपारगुडे )- जनमाणसात वावरताना जिवंत माणसांची स्त्रीयांना ज्यास्त भिती वाटत आहे. स्मशानभूमीत राहत असुनही मला भिती वाटत नाही उलट सुरक्षीत आहे.
पण बाहेरच्या जीवंत माणसांशी बोलताना व वावरताना कधी कोणाची नियत बदलेल याची खात्री राहीली नाही. म्हणून मेलेल्या माणसापेक्षा जिवंत माणसांची भिती वाटते. अशी प्रतिक्रीया – स्मशानभूमीत काम करणाऱ्या राधाबाई जाधव यांनी दिली. त्यांचा जागतिक महिलादिनानिमित्त माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सन्मान केला.
कोपरगावच्या आमरधाम येथे सन २००१ पासुन मृत व्यक्तीवर अंतिमसंस्कार करतात. जनमाणसातील पुरूषी विकृती वाढली. महिलांवर होणारे आत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान स्नेहलता कोल्हे यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, राधाबाईंची प्रतिक्रिया समाजाचे डोळे उघडणारी आहे. सध्या माणसांची प्रवृत्ती जनावरासारखी झाली नाही.
स्त्रीयांवर सामुहीक आत्याचार करणे, त्यांना जिवंत जाळे,अशा घटणा वारंवार घडत आहेत . कोणालाही कोणाची भिती राहीली नाही. पुरूषी विकृतीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्मशानभूमीत महीलांना सुरक्षीत वाटण्यामागे पुरूषी विकृती जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राधाबाई जाधव यांच्या मुलगी पल्ल्वी यांच्या शिक्षणाची जबाबदारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्वीकारली असता जाधव कुटुंबीयांनी त्यांचे समाधान व्यक्त केले.