कोल्हापूर – राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीवादाला सुरुवात झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा आरोप केला होता. आता आरोपाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः उत्तर दिलय. राज ठाकरेंच्या विधानाची दखल घेण्याची गरज नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी ठाकरेंच्या टीकेबाबत भाष्य केलं.
याआधी वारंवार राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महराष्ट्रात जातीयवादाला सुरुवात झाल्याची टीका केली होती. माध्यम कर्मींनी शरद पवार यांना या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले,”राज ठाकरे काहीही आरोप करू शकतात,राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण होते त्याची यादी पहा…भुजबळ होते,पिचड होते इतर बाकीचे नेते होते. हे नेते कोणत्या समाजाचे आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही” अशी प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.
जातीय विषय आमच्या मनात येत नाही आम्ही सर्व शाहू,फुले आणि आंबेडकर विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी काही टीका केली तरी आम्ही त्याची दखल घेत नाही असंही पवार यावेळी म्हणाले. यानंतर उद्धव ठाकरेंबाब बोलताना पवार म्हणाले,आमदार आणि खासदार जरी ठाकरेंना सोडून गेले असले तरी ग्राऊंडवर काम करणारा शिवसैनिक आजही त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे उद्या निवडणूक लागल्यावर या लोकांची भावना नेमकी काय आहे हे समजेलच.