अतिवृष्टी, अवकाळी पावसाच्या पंचनाम्यामुळे पेरणीस विलंब
नगर – खरीप हंगामाच्या शेवटी अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या नुकसान भरपाई साठीचे पंचनामे आदी प्रक्रियांमध्ये मोठा कालावधी गेल्याने रब्बीच्या पेरण्यांनाही विलंब झाला. त्यानंतर पेरणी सुरू झाली. आजमितीला 3 लाख 56 हजार 864 हेक्टर जमिनीवर पेरणी झाली असून ही एकूण जमीनीच्या 53 टक्क्यां इतकी आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीचे 2 लाख 20 हजार 64 हेक्टर जागेवर पेरणी झाली असून एकूण क्षेत्राच्या 47 टक्के इतके आहे. तर 5 हजार 942 हेक्टर इतकी गव्हाची पेरणी झाली असून तिची सरासरी 12 टक्क्यां एव्हढी आहे. तर मका या पिकाची 4 हजार 843 म्हणजेच एकूण क्षेत्राच्या 16 टक्के आणि इतर रब्बी तृणधान्ये 45 हेक्टर वर पेरणी झाली असून त्याची टक्केवारी 16 टक्के असून एकूण 2 लाख 30 हजार 894 त्याची टक्केवारी 42 टक्के इतकी आहे. तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची 22 हजार 193 हेक्टर म्हणजेच 19 टक्के इतर रब्बी कडधान्य, इतर रब्बी अन्नधान्य 2 लाख 53 हजार 806 म्हणजेच एकूण आकडेवारीच्या 38 टक्के पेरणी झाली आहे.
एकूण रब्बी गळीत हंगामाच्या 2 लाख 53 हजार 854 इतक्या क्षेत्रावर म्हणजेच 38 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच रब्बी हंगामातील ऊस लागवड चारापिके, कांदा पिके, भाजीपाला पिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी पिके, फुलपिके, फळपिके यांचे क्षेत्र 6,67,261 हेक्टर इतके असून त्यापैकी 3 लाख 56 हजार 864 हेक्टर इतक्या जमिनीवर पेरणी झाली आहे म्हणजेच एकूण क्षेत्राच्या 53 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
दि.20 रोजी पर्यंत 692.19 मी. मी. म्हणजेच सरासरीच्या 139 टक्के पाऊस पडल्यानंतर पावसाळ्याच्या शेवटी शेवटी जिल्ह्याला अतिवृष्टी, अवेऴी पावसामुळे ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. तूर या पिकाची 274.47 टक्के इतकी पेरणी झाली झाली असून हे पीक फुल शेंगा लागण्या अवस्थेत आहेत. पीक परीस्थिती चांगली असून अल्पप्रमाणात पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भुईमुगाच्या पिकाबाबततही 128.93 टक्के पेरणी झाली असून पीक परीस्थिती चांगली असून शेंगापल्व होण्याच्या अवस्थेत आहे.
कापसावर मात्र अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असून सततच्या पावसाने काही क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर रब्बी ज्वारी पेरणी अंतिम टप्प्यात असून त्यावरील अमेरीकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसत असून किड नियंत्रण उपाय योजना चालू आहेत.