नाणे मावळ – मावळ तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच दौंड तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांत कमालीचा वातावरणात बदल झाल्याने रब्बी हंगामातील पिके पुन्हा विविध रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी आणि खर्चिक ठरला. खरिपातील मका, बाजरी आदी पिके अवकाळी पावसाने खराब झाली, सडून गेली. असे असूनही येथील शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली आहे.
मात्र, वातावरण सातत्याने बदलत असल्यामुळे रब्बीचे पीक पण जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. महागडे बियाणे आणून पिकांची लागवड केली आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांत वातावरण बदलामुळे रब्बी पीकही धोक्यात आले आहे.