पाटणा – जेडीयु पक्षातून बाहेर पडताच या पक्षाचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर चांगलीच तोफ डागली असून त्यांनी म्हटले आहे की नितीशकुमार हे बदला घेण्याच्या भावनेतून पछाडलेले आहेत. म्हणूनच त्यांनी माझ्या मुलींनाही लक्ष्य केले आहे. नितीशकुमार यांनी कितीही आदळआपट केली तरी पुढील सात जन्म तरी ते पंतप्रधान बनू शकणार नाहींत असेही त्यांनी म्हटले आहे.
मी केंद्रीय मंत्री बनल्यामुळे नितीशकुमार माझ्यावर पहिल्यापासूनच खार खाऊन होते व त्यांच्या मनात माझ्या विषयी इर्षा निर्माण झाली होती असेही त्यांनी म्हटले आहे. वास्तविक आरसीपी सिंह हे जेडीयुचे वरीष्ट नेता होते व नितीशकुमार यांच्या ते विश्वासातील मानले जात होते. पण त्यांना पुन्हा राज्यसभा सदस्यत्व पक्षाने दिले नाही त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले आहे. तेव्हापासून त्यांच्यात वितुष्ट आले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला….
नितीशकुमार यांना जाहीर आव्हान देताना ते म्हणाले की माझी त्यांच्याशी मैदानात कुठेही राजकीय लढाई लढण्याची तयारी आहे. त्यांनी आडून आमच्या परिवारावर वार करण्यापेक्षा त्यांनी मैदानात माझ्या समोर उतरून दाखवावे. जेडीयु पक्षाने आरसीपी सिंह यांच्या परिवाराने जमवलेल्या बेकायदेशीर संपत्तीच्या चौकशीचा आदेश दिल्यानेही ते भडकले आहेत.
हे राम! अयोध्येत बेकायदेशीर जमीन बळकावणाऱ्यांच्या यादीत अनेक भाजप नेत्यांचा समावेश