कोल्हापूर – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात मराठा समाजाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झालेले आहेत. खासदार संभाजीराजेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा मराठा समाजाचे साठी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून त्वरित मार्ग काढावा या… व्यतिरिक्त आम्हाला काहीही माहित नाही असं संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केला आहे.
या पत्रात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत मराठा समाजाने या राष्ट्रासाठी आजपर्यंत सर्वोच्च त्याग केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी ज्या मराठा समाजाला बहुजन समाजासोबत आरक्षण देऊन सर्व बहुजनांना एका छताखाली आणले होते, अशा मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही.
मागील राहिलेल्या उणीवा दुरुस्त करून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण कसे देता येईल ? यावर विचार विनिमय करून त्वरीत मार्ग काढण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाची आहे, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही. अस संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.