नवी दिल्ली : देशभरात करोनाचा हाहाकार सुरु असून कुंभमेळ्यातही त्याचा शिरकाव झाला आहे. कुंभमेळ्यामुळे आगामी काळात देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा आटोपण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कुंभमेळ्यातून साधू मुंबईत परतल्यावर करोनाचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
95% of Mumbaikars are adhering to COVID19 restrictions. The remaining 5% of people who are not following restrictions are causing problems to others. I think a complete lockdown should be imposed looking at the current COVID19 situation: BMC Mayor Kishori Pednekar#Mumbai pic.twitter.com/CtX56y9etI
— ANI (@ANI) April 17, 2021
याच मुद्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पत्रकरांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’राज्यात सध्या करोनाचा तांडव सुरु आहे. अशात जर महाराष्ट्रात कुंभमेळ्यातून साधू किंवा भाविक मुंबई तसेच महाराष्ट्रतील इतर ठिकाणी येत असेल तर यामुळे करोना रुग्ण संख्या वाढू शकते. त्यामुळे या भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चानं क्वारंटाईन व्हावं. मुंबईतही जे भाविक परतणार आहेत त्यांनाही क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत.
त्या पुढे म्हणाल्या, ‘कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविक ‘प्रसाद’ म्हणून करोना घेऊन येवू शकतात. आधीच राज्यासह मुंबईतही करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविक क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.