नवी दिल्ली – करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्षाने पुढे ढकलण्यात आल्याने भारताच्या खेळाडूंना ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याची नामी संधी मिळालेली आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी म्हटले आहे.
या स्पर्धांपूर्वी खेळाडूंना सराव मिळावा. मात्र, केवळ परवानगी देऊन प्रश्न सुटणार नाही तर त्यांच्या आरोग्याची काळजी सर्वात महत्त्वाची आहे त्यामुळे याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. प्रेक्षकांना मैदानांपासून लांब ठेवले आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सराव कराव लागेल, असेही रिजीजू म्हणाले.