सासवड – गेली 45 वर्ष सात्यत्याने साजरा होत असलेला कवी कालिदास दिन अर्थात आषाढस्य प्रथमे दिवस हा कार्यक्रम दिवंगत साहित्यिक नानासाहेब पुरंदरे यांच्या पुरातन वाड्यात साजरा करण्यात आला. या वर्षी प्रथितयश व्यक्तीला न बोलाविता सासवडमधील साहित्य प्रेमींच्या गप्पा अशा स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील अनेक साहित्यप्रेमींनी हजेरी लावली. नानासाहेब यांच्या कन्या वर्षा यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रस्तावना केली. आचार्य अत्रे, नानासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी, चारोळ्या व अभंग इत्यादी साहित्य गप्पा यावेळी रंगल्या.