चंदीगड – लॉकडाऊनची मुदत वाढवण्याचा निर्णय घेणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपत आहे त्यानंतरही दोन आठवडे तेथे लॉकडाऊन आणि संचारबंदी कायम असणार आहे.
मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंग यांनीच आज ही घोषणा केली. तथापी रोज सकाळी सात ते अकरा या चार तासांच्या अवधीत लॉकडाऊन शिथिल राहणार आहे. त्या अवधीत लोकांनी त्यांची दैनंदिन कामे घराबाहेर पडून करता येतील आणि आवश्यक त्या वस्तुंची खरेदी करता येईल, असे त्यांनी नमूद केले. अकरा वाजल्यानंतर मात्र लोकांना सक्तीने घरातच राहायचे आहे अकरा नंतर कोणलाही बाहेर फिरू दिले जाणार नाही.