मुंबई – पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) सध्या टाळे ठोकण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँक आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला. यामुळे खातेदार बँकेत जमले असून कर्मचाऱ्यांसोबत वाद चालू आहे.
बँकिंग रेग्युलेशन कायदा ३५ अ नुसार बॅंकेचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश आरबीआयने पीएमसीला दिले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यासाठी असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
– याअंतर्गत कोणताही ठेवीदार आपले बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही जमा खात्यातून महिन्याला एक हजाराहून अधिक रक्कम काढू शकत नाही.
– पीएमसी बॅंकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता याणार नाही.
– तसेच इतर कोणत्याही नवीन ठेवी स्वीकारता येणार नाही.