AAP Crisis : राज्यसभेतील खासदारांनंतर आता आम आदमी पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पक्ष चे तब्बल ५० आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (AAP Crisis) हा दावा अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “सध्या खासदार फुटले आहेत, पण पुढे ५० आमदारही भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करू शकतात. पक्षाने याकडे गांभीर्याने पाहायला हवे.” पंजाब विधानसभा निवडणुकीत २०२२ मध्ये ‘आप’ने ११७ पैकी ९२ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र आता २०२७ च्या निवडणुकांपूर्वीच पक्षात अस्थिरता निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत. (AAP Crisis) दरम्यान, ‘आप’चे नेते संजय सिंह यांनी भाजपवर “ऑपरेशन लोटस” चालवण्याचा आरोप केला आहे. “देशभरात आमचे आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले. या घडामोडींमुळे पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, या दाव्यांमुळे पंजाबमधील ‘आप’ सरकार अस्थिर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. (AAP Crisis) हेही वाचा : Raghav Chadha: राघव चड्ढा यांना मोठा धक्का ; AAP कडून राज्यसभेतील उपनेते पदावरून हकालपट्टी BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मोठी घोषणा ! थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केला जाहीर