पुणे – आद्य अमृततुल्य चहा हा पुण्यातील पहिला अमृततुल्य चहा म्हणून ओळखल्या जातो. 1924 मध्ये विश्वनाथ नर्तेकरांनी या चहाच्या दुकानाची स्थापना केली आणि त्यावेळी त्यांनी या चहाला अमृततुल्य असं संबोधलं होतं. त्यामुळे चहाला अमृतततुल्य म्हटलं जातं, असं विश्वनाथ नर्तेकरांचे पणतू चंद्रशेखर नर्तेकरांनी सांगितलं.
या नर्तेकर कुटुंबियांची चौथी पिढीही हा अमृततुल्य चहाचा व्यवसाय करतात. 97 वर्षापासून हे कुटुंब चहाचा व्यवसाय सातत्यानं करत आहेत.
अमृत म्हणजे मेलेल्या माणसाला नवीसंजीवनी देणारं पेय तसेच मरगळलेल्या माणसाला नवी संजीवणी देणारं पेय म्हणजे अमृतासमान लागणारा चहा म्हणजे अमृततुल्य चहा या कारणामुळे चहाला विश्वनाथ नर्तेकर यांनी अमृततुल्य नाव दिले आणि आज ते नाव सगळीकडे प्रसिद्ध आहे.
दरम्यान, या आद्य अमृततुल्यमध्ये नेते, अभिनेते आवर्जुन भेट देतात. काहीच दिवसांपुर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने या चहाचा आस्वाद घेतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते.