पुणे – करोनाचा प्रादुर्भाव लक्षात आणि विद्यार्थ्यांचे आरोग्याचा विचार करता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्याच धर्तीवर मेडिकल, आयआयटी, नामवंत शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर घेण्यात येणारी नीट, जेईई मेन्स परीक्षाही रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यावरून प्रोफेशनल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा रद्द करावी, असा प्रवाह पुढे येत आहे. बारावी परीक्षेला जवळपास 15 लाखांहून विद्यार्थी बसतात.
विद्यार्थी संख्येचा विचार करून करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. आता केंद्रीय स्तरावरील परीक्षेसाठी जवळपास देशभरातील 15 लाखांहून विद्यार्थी एकाच वेळी करोनाच्या संकट काळात परीक्षेचे नियोजन करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. बारावीप्रमाणेही केंद्रीय प्रवेश परीक्षांना तेच निकष लागू आवश्यक आहेत. त्यामुळे नीट, जेईई मेन्ससारख्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सीईटीपुढे आव्हान
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश ही सीईटीद्वारे होत असते. महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या सीईटीला 4 लाखांहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात. ही परीक्षा पुढच्या महिन्यात प्रस्तावित आहे. या सर्व विद्यार्थ्यांची सीईटी घेणे करोनाच्या काळात तंत्रशिक्षण विभागापुढे एक आव्हान उभे राहिले आहे.