पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दत्तवाडी व जवळील परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असून नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर यांनी केली होती. त्याची गंभीर दखल पुढील दोन दिवसात हा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहे.
दत्तवाडीत अनेक भागात वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने बारावकर यांनी महापालिकेवर या भागातील महिलांसह हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तसेच तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन पावसकर यांना दिले होते. त्याची दखल घेत, तातडीनं पावसकर यांनी या भागातील संबंधित फोन करून तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहेत. त्यामुळे तूर्तास हा हंडा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे बारावकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख अमोघ ढमाले, पंकज बुरटे, अनिल फलटणकर, सुधीर दळवी,
तन्मय भोसले , कादर शेख , शिवम वाघमारे , आदित्य गायकवाड , सागर कदम उपस्थित होते.