पुणे- जिल्हातही आता तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरात तिसऱ्या टप्पातील निर्बंध कायम असणार आहेत.
मात्र, ग्रामीण भागाचा समावेश अजूनही चौथ्या टप्प्यात होत होता. त्यामुळे ग्रामीण भागात फक्त किराणा, दूध, चिकन, भाजीपाला यांच्यासह कृषी सेवा देणारी दुकानेच सुरू होती. आता ग्रामीण भागातही तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार असल्याने सोमवार ते शुक्रवारी इतर दुकाने सुरू राहणार आहे. तसेच हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे.
पवार म्हणाले, “पुणे शहरामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 4.6 वरून 5.3 टक्क्यांवर गेला आहे. तर पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्ही रेट हा 5.1वरून
5.4 टक्के झाला आहे. ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या काहीही कमी होताना दिसत आहे. तेथील 7.6 टक्के असलेला पॉझिटिव्हिटी रेट हा 7.3 टक्के आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा तिसऱ्या टप्प्यात आहे.
23 वारकरी करोना बाधित
आळंदी येथून पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांची आरटी-पीसीआर बंधनकारक करण्यात आली. त्यानुसार 306 पैकी 23 वारकरी करोना बाधित आढळले. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. या वारकऱ्यांना म्हाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले असून त्यावर उपचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.