पुणे- राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शेतातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी या ऍपमध्ये नोंदविता आलेली नाही, याचा विचार करून जमाबंदी आयुक्त कार्यालयाने ई-पीक पाहणीची नोंद करण्यासाठी दि. 15 मार्च 2022 पर्यंत मुदत दिली आहे. शेतकऱ्यांनी या मुदतीमध्ये ई-पीक पाहणी मोबाइल ऍपद्वारे पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.
ई-पीक पाहणी मोबाइल ऍपच्या साहाय्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे न जाता मोबाइलवरून शेतातील पिकांची नोंदणी करता येते. महसूल विभागाचा हा प्रकल्प दि. 15 ऑगस्ट 2021 पासून राबविण्यात येत आहे. या ऍपद्वारे आतापर्यंत एक कोटींपेक्षा
अधिक शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली आहे.