पुणे – जलसंपदा विभागाने दि.1 जूनपासून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी महानगरपालिका, नागरिक यांना दोन तासांपूर्वीच माहिती द्यावी. तसेच प्रत्येक 15 मिनिटांनी पावसाची अद्ययावत माहिती करून ुुु.र्िीपशषश्रेवलेपीीेंश्र.लो या संकेतस्थळावर टाकावी. मोबाइल क्रमांक आदेश कार्यप्रणालीद्वारे नागरिकांपर्यंत माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
गेल्या दोन-चार वर्षांत कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी आलेला पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नागरिकांचे स्थलांतर, मृत्यू, बाधित पशुधन, पिके-जमिनीचे नुकसान, घरे, रस्ते, पूल यांची पडझड अशी मोठी जीवित तसेच वित्तहानी होत आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे स्थलांतर, मदत यंत्रणा, अपुरे मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी पावसाळ्यातील खबरदारी म्हणून हवामान, जलसंपदा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा परिषद, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.