पुणे – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या मागणीला पाठपुरावा करण्यासाठी कायमस्वरूपी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल आहे. पुणे बार असोसिएशनच्या वतीने खंडपीठ विषयावर शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये हा निर्णय झाला.
पुणे येथे खंडपीठ स्थापन होण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पुणे आणि औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू होण्याचा ठराव 1978 मध्ये विधी मंडळात ठराव झाला. 1981 औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. मात्र, अद्याप येथे सुरू झालेले नाही. गुणवत्तेनुसार आणि कोणत्याही परिस्थितीत पुण्यात व्हावे, निर्णय बैठकीत झाला. स्थापनेबरोबरच कृती समितीचे कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुढील दिशा आता पुणे खंडपीठ कृती समिती ठरवणार आहे आणि त्या प्रमाणे आता पुन्हा एकदा ही मागणी पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ऍड. हर्षद निंबाळकर, अहमदखान पठाण, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. राजेंद्र उमाप, बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष डॉ. सुधाकर आव्हाड, डी.डी. शिंदे यांच्यासह बार असोसिएशनचे अनेक माजी अध्यक्ष ,पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड पांडुरंग थोरवे यांनी कायमस्वरूपी कृती समिती ची गरज असल्याचे सांगितले आणि ही कृती समिती लवकर जाहीर करणार असल्याचे सांगितले. या वेळी पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे आणि ते कसे योग्य आहे या बाबत डॉ.आव्हाड ,ऍड. निंबाळकर ,ऍड. पठाण ऍड उमाप, ऍड गिरीश शेडगे, ऍड. सतीश पैलवान ,ऍड. मंगेश लेंडघर,ऍड. प्रतिभा घोरपडे, ऍड. शाहिद आखतर यांनी उपस्थित वकील वर्गाला संबोधित केले.
पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ऍड. अमोल शितोळे, सचिव ऍड. सुरेखा भोसले, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ऍड. शिल्पा कदम यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.