बारामती – “म्युकोर मायकोसिस’चे रुग्ण सध्या आढळून येत आहेत. या आजाराच्या उपचारासाठी लागणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे या आजारावरचे औषध उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा आजार होण्यामागच्या कारणा संदर्भात ऑक्सिजनमध्ये वापरले जाणारे पाणी वेळेवर बदलणे जाणे आवश्यक आहे. यासह अन्य कारणे महाराष्ट्र टास्कफोर्सने सांगितले आहेत, अशी अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले की, देशाला जेवढी लस हवी आहे. त्या प्रमाणात लस मिळत नसल्याने ठिकठिकाणचे लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. सीरम कंपनीकडून लसीचे उत्पादन सुरू असून, भारत बायोटेकसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकदम लसींची मागणी वाढल्यामुळे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले आहेत.लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांसाठीच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.